spot_img
20 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

प्रा. सुधाकर कुलकर्णी यांच्या अमृत महोत्सवाप्रसंगी राजकीय विचार मंथन गौरव ग्रंथाचे प्रकाशन….. 

 

० माजी विद्यार्थ्यांचा हा सोहळा म्हणजे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पॅटर्नची सुरुवात…..

मुरुम प्रतिनिधी :-

येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील एमसीव्हीसी सभागृहात आयोजित रविवारी (ता. १६) रोजी प्रा. सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते. यावेळी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा उपकेंद्राचे संचालक डॉ. राजेश शिंदे, प्राचार्य डॉ. कुसुमताई पवार-मोरे, लातूरचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गंगाधर हिंगोले, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. डॉ. डी. एन. मोरे, बसवेश्वर संस्थेचे संचालक सुनिल मिटकरी, प्रदिप दिंडेगावे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी दयानंद कला महाविद्यालयाची बी. ए. द्वितीय (संगीत) वर्षाची कुमारी मनश्री महेश मोटे हिने स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हे गीत सादर केले. सत्कारमूर्ती प्रा. सुधाकर कुलकर्णी यांच्या मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. संग्राम मोरे यांनी केले. संयोजन समितीच्या वतीने प्रा. सुधाकर कुलकर्णी यांचा सपत्नीक पूर्ण आहेर, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजकीय विचार मंथन गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संयोजन समितीचे प्रमुख प्रा. डॉ. महेश मोटे, सदस्य प्राचार्य डॉ. नरसिंग येचाळे, डॉ. संजय मोरे, प्रा. डॉ. श्रीराम भालेराव, प्रा. डॉ. जगदीश देशमुख, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. यशवंत वळवी, प्रा. कल्याण कांबळे, विनायक बोरीकर, प्रा. डॉ. हरिश्चंद्र चौधरी, प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे, प्रा. डॉ. रत्नाकर बेडदे, डॉ. गणपत कारिकंटे, इस्माईल शेख आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष माजी खा. डॉ. सुनिल गायकवाड यांनी केले. संयोजन समितीचे प्रमुख प्रा. डॉ. महेश मोटे यांनी या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. मनोगत प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले, प्राचार्य डॉ. कुसुम पवार, डॉ. राजेश शिंदे, प्रा. गंगाधर हिंगोले, प्राचार्य डॉ. संजय गवई, इंदुमती कुलकर्णी, डॉ. अमित कुलकर्णी, प्रा. सुषमा अंधारे, प्रा. कल्याण कांबळे, डॉ. संजय मोरे, प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे आदींनी व्यक्त केले. यावेळी ऑनलाइन चित्रफितीद्वारे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राज्यशास्त्र विषयाची प्रासंगिकता, राजकीय प्रक्रिया, बदलते राजकीय प्रवाह याविषयी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन राजकीय विचार मंथन या गौरव ग्रंथाची निर्मिती केली, हे निश्चितच वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. आपल्या गुरुप्रती असणारी कृतज्ञता माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करणे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. o डॉ. व्ही. एन. इंगोले म्हणाले की, राज्यशास्त्राचे अध्ययन करणे म्हणजे आदर्श नीतिमान नागरिक बनविण्याची प्रक्रिया होय. आज लोकशाहीच्या राजकीय मूल्यांकडे दुर्लक्ष होत असताना सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले त्यांचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात गुरूंच्या विचारांची परंपरा जोपासून त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव ठेवून अशा सोहळ्याचे आयोजन करतात हीच त्यांच्या कार्याची उपलब्धी आहे. o प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्या की, प्रा. कुलकर्णी सरांनी वर्गात आम्हाला जी राजकारणाबाबत वैचारिक मूल्ये शिकवली. ती मूल्ये सध्याच्या राजकारणात हरवत चाललेली आहेत. लोकशाही अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने नवीन पिढी अधिक सक्रिय झाली पाहिजे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी राजकीय मूल्ये, राजकीय सिद्धांताचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरत आहे, असे मूल्याधिष्ठित राजकारण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. o सत्काराला उत्तर देताना प्रा. सुधाकर कुलकर्णी म्हणाले, आज हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आणि आनंदाचा आहे. ७५ वर्षांचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ ज्ञानदानाचा नव्हता, तर हा एक उत्तम अनुभवाचा होता, जिथे मी विद्यार्थ्यांबरोबर शिकतही गेलो. मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन कार्यास सुरुवात केली. ती संस्था महात्मा बसवेश्वरांच्या नावाने चालते आहे. त्यांच्या विचाराची परंपरा मी पुढे नेण्याचा केवळ प्रयत्न केला आहे. राज्यशास्त्र हा विषय केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज जेव्हा माझे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपली चमक दाखवतात, तेव्हा माझ्या कार्याची खरी पोचपावती मला मिळते. जेव्हा विद्यार्थी यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांचा सन्मान करतात. माझ्या अध्यापन प्रवासात अनेक आव्हाने आली, पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील कुतूहल आणि शिकण्याची जिद्द हीच माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायक ठरली.
सत्कार हा केवळ व्यक्तीचा नसतो, तर तो त्या विचारांचा असतो. जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधाचा असतो. शिक्षण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञान मिळवण्याची आणि देण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही. म्हणूनच, नवीन विचार आत्मसात करा, समाजासाठी योगदान द्या आणि उत्तम नागरिक बना असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. o अध्यक्षीय समारोपप्रसंगी माधवराव टाकळीकर म्हणाले, की, गुरु शिष्याची ही परंपरा निश्चितच पुढील पिढीसाठी आदर्शवत आहे. याप्रसंगी जो गौरव ग्रंथ काढला तोही वाचकांना प्रेरणादायी ठरेल. माजी विद्यार्थ्यांचा हा सोहळा म्हणजे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पॅटर्नची सुरुवात आहे. आमच्या संस्थेने जे मूल्याधिष्ठित शैक्षणिक कार्य केले, त्याचीच कृतज्ञता म्हणजे आजचा सोहळा आहे. हीच परंपरा पुढेही ठेवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रविण गिरी तर आभार प्रा. डॉ. रत्नाकर लक्षटे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक, मित्रपरिवार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ला

लातूर, जि. लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्रा. सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित राजकीय विचार मंथन या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करताना माधवराव टाकळीकर, व्ही. एन. इंगोले, सुधाकर कुलकर्णी, राजेश शिंदे, कुसुम पवार, गंगाधर हिंगोले, संजय गवई, संपादकीय मंडळ व अन्य.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या