spot_img
-10.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

आणदुर जिप गटात अटीतटीची लढत कॉंग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहणार की भाजपाचा कमळ फुलणार?

आणदुर जिप गटात अटीतटीची लढत

 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहणार की भाजपाचा कमळ फुलणार?

————————

तुळजापूर ( सतिश राठोड ) :-

आणदुर जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरली असून संपूर्ण गटाचे लक्ष उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. परंपरेने कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात यंदा मात्र राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत.

महायूतीकडून अ‍ॅड. दिपक दादा आलूरे तर महाविकास आघाडीकडून (शिवसेना उबाठा गट) डॉ. जितेंद्र कानडे हे उमेदवार रिंगणात असून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला. त्यामुळे ही लढत “काँटो की टक्कर” अशीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

*वकील विरुद्ध डॉक्टर – मतदारांचा कौल कुणाला?*

एकीकडे कायदेविषयक अनुभव, संघटन कौशल्य आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले अ‍ॅड. दिपक दादा आलूरे, तर दुसरीकडे सामाजिक कार्य, वैद्यकीय सेवा आणि तरुण वर्गाशी थेट संपर्क असलेले डॉ. जितेंद्र कानडे—अशा दोन वेगवेगळ्या प्रतिमांमधून मतदारांना निवड करावी लागली आहे.

ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. दोन्ही उमेदवारांनी घरोघरी भेटी, सभा, संपर्क मोहिमा राबवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. “बदल हवा” की “परंपरा कायम” यावर मतदारांचा कौल कुठे झुकतो, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

निकालाकडे सर्वांचे लक्ष

आणदुर जिप गटात कॉंग्रेसचा बालेकिल्ला कायम राहणार की भाजपाच्या नेतृत्वाखालील महायूतीला यश मिळणार, हे उद्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. *वकील की डॉक्टर*—मतदार राजाने कोणाला पसंती दिली, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या