spot_img
17.1 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक, ४८ बंजारा तांड्याचा नवीन ग्राप स्थापनेचा प्रस्ताव

धाराशिव प्रतिनिधी :-

शासनाच्या श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली असून बैठकीत जिल्ह्यातील 48 बंजारा तांड्याचा विभक्त ग्रामपंचायत प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखास जिल्हाधिकारी कीर्ती कुमार यांनी दिले .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या तांड्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून तांड्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता पात्र असलेली बंजारा तांडे ही स्वतंत्र ग्रामपंचायत करून विभाजन करण्यासाठी एक हजार लोकसंख्येची आठ रद्द करून 700 लोकसंख्या केली आहे तसेच गावापासून तीन किलो मीटरची आठ रद्द करून एक किलोमीटर करण्यात आली आहे तसेच धाराशिव जिल्ह्यासाठी एक कोटी बारा लक्ष रुपयाचा निधी बंजारा तांडा समृद्धी योजने करीता शासनाकडून प्राप्त झाले आहेत यासाठी लवकरच बंजारा तांड्याच्या विकासाकरिता निधी मिळणार आहे .या बैठकीस श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री कीर्ती कुमार एच पुजार , सदस्य सचिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडबोले व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्यांच्या वतिने जिल्हाधिकारी किर्ती कुमार एच पुजार याचा सन्मान करण्यात आला .यावेळी श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेचे नागपूर विभाग व छत्रपती संभाजी नगर विभागाचे अशासकीय सदस्य प्रवीण पवार , धाराशिव जिल्हा अशासकीय सदस्य संतोष चव्हाण , विलास राठोड , अतुल राठोड , राणीताई राठोड, पिंटू राठोड , विकी राठोड आदीची उपस्थिती होती .

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या