spot_img
6.7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

सावरगाव,जळकोटवाडी येथे वारंवार विजय पुरवठा खंडित; द्राक्ष बागायतदार चिंतेत 

 

 

काटी / प्रतिनिधी :- ( उमाजी गायकवाड )

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील विद्युत उपकेंद्रातून सावरगाव, जळकोटवाडी, वडगाव (काटी)पुरवठा केला जातो. सावरगाव येथील विद्युत पुरवठा केला जाणारा 5 एच.पी.ट्रान्स्फॉर्मर बदलून 10 एच.पी. ट्रान्सफॉर्मर बसवला परंतु नवीन ट्रान्सफॉर्मर चार्जिंग नसल्यामुळे विद्युत पुरवठा सलग दोन ते तीन बंद होता. तीन दिवसांनंतर विद्युत पुरवठा सुरू झाला परंतु सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने द्राक्ष काढणीस आल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.

 

सुरुवातीपासून भारनियमन, तर अनेक भागांत कमी दाबाने व मधूनच खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे पिकांना सिंचन करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ‘सांगा आम्ही शेती करू कशी?’ असा संतप्त सवाल द्राक्ष बागायतदारासह शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

सध्या भाजीपाला पिके उभी आहेत व द्राक्ष हंगाम काढणी सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर सिंचन करण्यासाठी वीजपुरवठा होत नाही. विद्युत पुरवठा करण्यासाठी तीन महिन्यापुर्वी नवीन पोल उभा केले आहेत. परंतु ते काम पोल उभा करुनच थांबले. त्यामुळे जुन्या लाईन वरुन वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. नवीन ट्रान्सफॉर्मर जुलैमध्येच आला होता परंतु ट्रान्सफॉर्मर बसवण्यास विलंब झाला. बदलत्या भारनियमन वेळा, त्यात मधूनच खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे पिकांना जगवायचे, अशी शेतकऱ्यांची ओरड आहेत. शुक्रवारी पाचव्या दिवशीही विद्युत पुरवठा खंडित होता.

आठवड्यात 3 दिवस 8 तास दिवसा आणि उरलेले 4 दिवस 8 तास रात्रीची असते. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा फार मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे,

प्रगतिशील द्राक्ष बागायतदार तथा कृषिभूषण शेतकरी

त्रिंबक फंड, जळकोटवाडी ता. तुळजापूर

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या